जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल, आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे.
अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.
आपण रोज स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतोय आणि या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो, जो की श्री स्वामी समर्थ अष्ट नामावली मधला एक मंत्र असतो, आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा घरी राहूनच अवश्य करावी.
तर आज सुद्धा आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे आणि सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे. मग यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या परिवाराच्या सुख- समृद्धी साठी, आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी तुम्हाला हात जोडून बोलायचं आहे.मग यानंतर “ओम परब्रम्हय नमः”, “ओम परब्रम्हय नमः” हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस बोलायचं आहे.
याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंत्राचा जप तुम्हाला 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही किंवा 21 पेक्षा जास्त वेळाही नाही आणि त्यांना हा मंत्र बोलताना कोणतीही घाई करायची नाही, मंत्र एकदम हळुवार, सावकाशपणे बोलायचा आहे. त्यामुळे ही सेवा करतांना ती सेवा पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने श्री स्वामीं समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे.
जर तुम्ही विश्वासाने आणि मनोभावाने ही सेवा कराल हा मंत्र बोलाल, तर श्री स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व दुःख, सर्व अडचणी सर्व संकट सर्व समस्या तुमच्या दूर करतील. आजच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष देवा करा आणि या विशेष मंत्राचा जप करा.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!