मित्रांनो, आपले स्वामी बोलतात, तुला लाख रुपयांची नोकरी लागेल. गणे श बल्लाळ मुळेकर कोर्टात काम करत होते त्यांना त्यांच्या बंधूंनी कलेक्ट र च्या ऑफिस मध्ये ऍड करून कारकुना च्या जागेवर लावले. परंतु त्यांचे अक्षर खराब असल्याने त्यांना कामावरुन काढून टाकले गणेशराव स्वामीं चे भक्त होते. अशा परिस्थितीत त्यांनी बाकी इतरत्र न जाता थेट स्वामीं कडे अक्कल कोट मध्ये आले. त्या दिवशी स्वामींनी रौ’द्ररूप धारण केले होते.
म्हणून स्वामींच्या जवळपास कुणीही जाण्याचे धाडस केले नाही. गणेश राव यांनी नैवेद्य दाखवून आपण आपली स’मस्या स्वामींना सांगावे, असा त्यांनी विचार केला. परंतु जेव्हा सेवेकरी नैवेद्य घेऊन गेले. तेव्हा स्वामींनी भरपूर शि’व्यांचा भडिमार सुरू केला आणि त्यामुळे नाईलाजास्तव गणेश राव यांना त्यांच्या कडून माघारी यावे लागले. सायंकाळच्या वेळेस स्वामी महाराज शांत झाले. तेव्हा हीच संधी साधून श्री गणेश यांनी स्वामींचे मंत्र वैगरे सेवा केली.
परंतु त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. असे दररोज दिवसातून चार-पाच वेळा येऊन बसत हिंमत काही होईना. असो पुढे एके दिवशी रामनवमी असल्याने तेथील एका सहकाऱ्याने गणेश यांना स्वामीं साठी दही आणण्यास सांगितले. ते बोलले, ठीक आहे. चालेल पण माझी नोक री गेली आहे कृपया आपण स्वामींना नोकरी बद्दल विचारा ही विनंती कर तो मग सेवेकरी त्यांना घेऊन स्वामींकडे आला आणि बोलला की, स्वामीं यांची नोकरी गेली आहे. तर यांना नोकरी केव्हा लागेल कृपा करून सांगा.
स्वामी सेवेकरी असे बोलताच, स्वामी तत्काळ उत्तरले, अरे नोकरी लाग ली आहे स्वामींनी असे बोलताच गणेश राव यांना आनंद झाला. तेव्हा त्यांनी पुन्हा विचारले. स्वामी किती रुपयांची नोकरी गणेश यांना लागेल. तेव्हा स्वामींनी पुन्हा उत्तर दिले अरे तुला लाख रुपयांची नोकरी लागेल. स्वामींच्या कृपेने गणेशला खूप आनंद झाला आणि माघारी आल्यानंतर त्यांनी आठ आण्याची दही आणली. आता गणेशराव निश्चिंत झाले. पुढे त्यांना गाणगापूर येथे जायचे होते. परंतु त्यांची खर्चाची टंचाई असल्याने त्यासाठी काही पैसे बाजूला ठेवले होते .
स्वामींना अर्पण करण्यासाठी त्यांनी खारका घेतल्या आणि स्वामींच्या सेवक-याने त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे जा नारळ घेऊन ये ते असे बोलताच गणेशराव माघारी गेले आणि त्यांनी नारळ विकत घेतला आणि स्वामी चरणी अर्पण केला. आणि गाणगापूर येथे जाण्यास निघाले. त्यावेळी नारळ घेतल्यामुळे पैशाचा खर्च यातून चार आणे कमी झाल्याने साहजिकच त्यांना कमतरता जाणवू लागली.
परंतु रस्त्याने जाताना त्यांना अनुभव आला तो असा की, रस्त्याने जात असताना त्यांना आठ आणे सापडले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, स्वामिनी आपल्याला पैसे दिले स्वामीचरणी केलेली भक्ती अनुभवून गणेशराव थक्क झाले.
पुढे गाणगापूर यात्रा करून जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना स्वामी वाणी चा अनुभव आला. अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्यांना सांगितले. की, तुला नोकरी लागली आहे. त्याच दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांचे पंधरा रुपयां चा कारखान्याचा जागेवर नेमणूक करण्याचा हुकूम आला. पुढे थोड्याच दिवसात असिस्टंट कलेक्टर ऑफिस मध्ये वीस रुपयांची जागा मिळाली आणि त्यांची नेमणूक अक्कलकोट पोलिटिकल एजंट साहेब यांच्या कचे रीत झाली.
आता त्यामुळे त्यांचे स्वामींचे दर्शन वारंवार होऊ लागले आणि स्वामी विधानाचा अनुभव घेतला. त्यांची आनंद भक्ती अजून दृढ होऊ लागली. पुढे पाच वर्षात गणेश राव यांना स्वामीवाणी प्रमाणे लाख रुपयांच्या नोक रीचा त्यांना अनुभव आला आणि त्यांनी स्वामींचा जयजयकार केला.
मित्रांनो आजच्या लेखातून आपणास असंख्य बोध भेटत आहे की, पुन्हा एकदा स्वामी आपणास आपला विश्वास दृढ करण्याचा हुकूम देत आहे आणि ही समज देत आहे की, जेव्हा आपण स्वामींना तळमळीने प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपणास तथास्तु म्हणून आपली मागणी पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कोणताही अविश्वास व भीतीला बळी न पडता विवेक जागृत ठेवून हृदयातून जे जे कर्म भेटते त्याचे अतिशय विश्वासाने, प्रामाणिकपणे पालन करावे.
म्हणजे स्वामी आपल्याला कोणत्याही सं’कटामध्ये एकटे सोडणार नाहीत आणि आपल्या भक्तीचे फळ ते नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस देतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!