मित्रांनो चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस, अशी एक व्याख्या सांगितली जाते. मुळात चूक घडली हे कळणं महत्त्वाचं आहे. कारण चुक प्रत्येकाकडून होते, चुक-चुकत आपण शिकत जातो, हातून चुका होणार नाहीत अशी व्यक्ती जगात नाही,
हा साधा विचार आपल्याला कळूनही, पटवूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेमध्ये आपलं आयुष्य वाया घालवतो. मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी?, हा जर तुमचा प्रश्न असेल, तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत वाचाच.
चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे. परंतु वारंवार 1 चूक घडत असेल तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो. तर मूळ मुद्दा हा आहे की, चुका अजाणतेपणी घडले आहेत की जाणून-बुजून केले हे लक्षात घेतलं पाहिजे.
उदाहरणार्थ – रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात, ही नकळत किंवा परिस्थितीमुळे झालेली चूक आहे, तर नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला उडवत जाणं ही मात्र जाणून-बुजून केलेली चूकच आहे. या दोघांतील फरक लक्षात घेतला, तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल.
काही गोष्टी स्थळ-काळ, परिस्थिती, व्यक्तींस्वरूप घडून जातात, त्या क्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्य भरासाठी अपराधी भावना निर्माण करणारा ठरू शकतो, अशा वेळी सगळ्या आधी घडून गेलेली गोष्ट ती टाळता आली असती का?, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहेत?, चूक मान्य केल्याने अपराधी भावनेतून मुक्तता होणार आहे का.?
या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार घडून गेलेल्या घटनेत कोणीच बदल घडू शकत नाही. परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्यामुळे त्या चुकीची जाणीव होऊन ती चूक हातून पुन्हा घडत नाही, ती पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो. शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो, यासाठी चूक झाली हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा, मोठेपणा हवा.
मात्र झालेली चुक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागृतपणाही हवा. या गोष्टींचा नीट विचार केला असता अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर व्हावे लागणार नाही. चुका होणं ही सामान्य बाब आहे, परंतु आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल तर ती चुक नाही,तर तो अपराध आहे.
या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वताला नाही. स्वतःशी आपण कायम प्रामाणिक राहायला हवं आणि आपल्या मनाचा कौल घेत राहायला हवं.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!