मित्रांनो अनेक मुलींना त्यांना हवा तसा नवरा मिळत नाही परंतु घरच्यांच्या दबावापुढे नाईलाजास्तव ठरवलेल्या मुलाशी त्या लग्न करतात. लग्नानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपला नवरा हा काही आपल्या स्वप्नातला राजकुमार नाहीये परंतु कोणताही दुसरा पर्याय नसल्याने अशाच व्यक्ती सोबत त्यांना संसार करत राहावं लागतं. हळूहळू जेव्हा त्यांचा इतर पुरुषांशी संबंध येऊ लागतो तेव्हा कधीतरी एखादा असा पुरुष त्यांना सापडतो की जो त्यांच्या स्वप्नातील राजकुमार सारखा असतो. त्या स्त्रीला वाटू लागतं की माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे तो हाच, परंतु त्यांना माहीत नसतं की समाजात असे अनेक पुरुष आहेत जे लग्न झालेल्या विवाहित महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असतात.
लग्न झालेल्या विवाहित महिलेची कमजोरी त्यांना चांगलीच माहित असते. ती स्त्री तिच्या पतीसोबत खुश आणि आनंदात नाही, तिचा नवरा तिचा अमुक अमुक इच्छा पुरवत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक असतं. अशा विवाहित महिलेची ते वेळोवेळी मदत करतात आणि या मदतीच्या उपकाराच्या ओझ्याखाली तिला दाबून टाकतात. तिचा पती तिच्यासाठी जे काही करत नाही त्या गोष्टी मुद्दाम हून तिच्यासाठी करून तिच्या मनामध्ये तिच्या पतीपेक्षा स्वतःच स्थान हे पुरुष मोठे बनवतात.
या जाळ्यामध्ये बहुतांश महिला खूप लवकर अडकतात. आज पर्यंत त्या महिलेने स्वतःच्या ज्या ज्या इच्छा अपेक्षा मारलेल्या असतात त्या इच्छा अपेक्षा हा पुरुष पूर्ण करतो आणि त्याची सवय त्या महिलेला लागते. त्या स्त्रीने ज्या इच्छा अपेक्षा मारलेल्या असतात त्या सतत गोड बोलून दररोज जर पूर्ण केल्या की त्याची सवय त्या स्त्रीला होते आणि मग स्त्रीला सुद्धा वाटू लागतं की हा जो पुरुष आहे त्याची गरज भागवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि मग हळूहळू आपलं शरीर सुद्धा ती त्या पुरुषाला प्रदान करते.
तिच्या मनात आपल्या पतीपेक्षा त्या पुरुषाचे स्थान मोठ बनत. पतीला कमीपणा दिला जातो आणि पती समोरच त्या पुरुषासोबत गप्पा गोष्टी सुरु होतात. अशावेळी त्या पतीला कळून चुकत की आपली पत्नी ही परपुरुषाच्या नादी लागलेली आहे. मात्र प्रॉब्लेम असा असतो की आता त्यांना मूलबाळ असतात आणि मुलाबाळांचा सांभाळ कसा होणार जर आपली ही बायको परपुरुषासोबत निघून गेली तर मुलांचा सांभाळ कसा होणार ही एक मोठी भ्रांती त्या पुरुषाला, त्या नवऱ्याला जाणवत असते.
आता अशा वेळी पत्नीने त्या परपुरुषाचा नाद सोडून पुन्हा संसार करावा यासाठी काही उपाय आहे का? दुसऱ्या केसमध्ये असं होतं की अनेक मुली जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावरती येतात आठवी, दहावी, अकरावी, बारावी तर त्यावेळी त्या एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडतात आणि आपलं आयुष्य बरबाद करून घेतात. या ठिकाणी आई-वडिलांची बदनामी सुद्धा होते.
तर अशा मुलींनी त्या मुलाचा नाद सोडावा यासाठी काहीतरी उपाय नक्की असतो, तो तंत्रशास्त्र मध्ये सांगितला आहे. हा तंत्रशास्त्रातील उपाय करून अनेक विवाहित महिला आणि अविवाहित मुली ताळ्यावर आलेले आहेत. आता नक्की होतं काय? एक आठवी ते बारावी पर्यंतच्या कॉलेजच्या किंवा शाळेतल्या तरुणी असतात त्यांचं प्रेमात पडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं.
तसेच त्यांना शारीरिक आकर्षण वाटतं आणि मग अगदी वेगळ्या जातीच्या, धर्माच्या मुला सोबत प्रेम प्रकरण होतं आणि मुली पळून जाऊन लग्न करतात. अर्थात यामुळे आईवडिलांची मोठी बदनामी होते, आजूबाजूची माणसं त्यांना वेगळ्या नजरेने पाहू लागतात अशा वेळी आपण काय करावं? एक तंत्रशास्त्रातला 100% काम करणारा उपाय सांगतो आहे हा उपाय मुलींना तरुणींना महिलांना ताळ्यावर आणतो.
तुमचं तुमच्या घरातल्या लोकांच म्हणणं या मुली आणि महिला ऐकू लागतात. आता हा उपाय कसा करायचा आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा हा काही वशीकरणाचा उपाय नाही, हा वशीकरण प्रयोग नाहीये. हा वशीकरणाचा काट आहे म्हणजे जी महिला किंवा जी मुलगी इतर व्यक्तीच्या प्रेमात पडलेली आहे तिला त्या प्रेमातून बाहेर काढण्यासाठीच हे एक तंत्र आहे हे लक्षात ठेवा.
आता हा उपाय करायचा कधी प्रत्येक महिन्यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, वगैरे, वगैरे. मराठीचे महिने आहेत या प्रत्येक महिन्यामध्ये एक दुर्गाष्टमी असते. तुम्ही कॅलेंडर मध्ये पाहा दुर्गाष्टमी दिसून येईल. तर त्या दुर्गाष्टमीच्या रात्री बारा वाजता वशीकरण यंत्र तुम्ही एका कागदावरती काढायचे आहे आणि त्या यंत्राची पूजा करायची आहे. पूजा कशी करणार हळदीकुंकू वाहा, उदबत्ती लावा, दीवा लावा आणि एक मंत्र सांगणार आहे या मंत्राचा तीन माळा जप तुम्हाला करायचा आहे.
तीन माळा एका माळेमध्ये 108 मनी असतात तुमच्या घरात जर जपमाळ नसेल तर तुम्ही कोणत्याही धान्याचे 108 दाणे मोजून घ्या, तांदूळ घ्या, कोणतेही धान्य घ्या 108 दाणे मोजून घ्या आणि एकेक दाणा खाली टाकत चला. अशाप्रकारे 108 वेळा 108 वेळा 108 वेळा तीन माळा जप करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून खडीसाखर या यंत्राला दाखवायचे आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे.
कामाख्या देवी अमुक नावाची स्त्री किंवा मुलगी या या व्यक्तीच्या आकर्षणात अडकली आहे आणि त्यामुळे घरातलं सौख्य हे गायब झाले आहे. या स्त्रीला किंवा या मुलीला या आकर्षणातून बाहेर काढ आणि आमच्या घरातील लोकांच म्हणण तिने ऐकावं अशी आमची प्रार्थना आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची टिंब टिंब किंवा अमुक शब्द वापरला त्या ठिकाणी त्या मुलीचं नाव तुम्ही घ्यायचे आहे.
आता रात्रभर हे यंत्र आपण तसंच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा या यंत्राची पूजा करून हे यंत्र आपण ताईत मध्ये घालून स्वतःच्या गळ्यात बांधायचे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येईल त्या दुर्गाष्टमीच्या रात्री अगदी अशाच प्रकारे ही पूजा आपण या यंत्राची करा. आठव्या दुर्गाष्टमी पर्यंत तुम्हाला दिसून येईल की तुमची मुलगी किंवा महिला, तुमची पत्नी ही तुमच्या ताब्यात आलेली आहे…
जे काही तिला आकर्षण वाटत होतं हे संपूर्ण आकर्षण नष्ट झालेल आहे. आता हे जे यंत्र आहे हे लक्षात घ्या यंत्र काढण्यासाठी जर तुमच्याकडे भूर्जपत्र असेल ज्याला भोजपत्र असही म्हणतात तर अतिउत्तम आहे. जर हे भोजपत्र नसेल तर हे भोजपत्र ऑनलाइन ॲमेझॉन वगैरे वेबसाईटवर सहज मिळून जात, जर हे नसेल तर तुम्ही साधा सफेद पांढरा कागद सुद्धा घेऊ शकता. हे यंत्र काढण्यासाठी अष्ट गंधाची शाई आपण वापरायची आहे.
बाजारात अष्टगंध सहज मिळेल तो अष्टगंध आणा पाणी टाकून त्याचा घोळ बनवा आणि चमेली च जे झाड असतं, या चमेलीच्या काढीने यंत्र आपण काढायचे आहे. ही सामग्री गोळा करणं थोडसं अवघड आहे मला माहितीये मात्र चमेलीची काढी तुम्हाला सहज मिळून जाईल. हे यंत्र काढताना लक्षात ठेवा सगळ्यात आधी जी वरची ओळ आहे ती आपण पूर्ण करायची आहे उजवीकडून डावीकडे आपण जसं मराठीत लिहित होतं असं लिहायचं नाहीये.
म्हणून सगळ्यात आधी उजवीकडचां अंक आपण लिहिणार आहोत ( 8, 4, 0, 11) लक्षात आलं, त्यानंतर दुसरी ओळ ( 14, 15, 3, 7), तिसरी ओळ (1, 19, 12, 27) आणि चौथी ओळ ( 6, 13, 6, 4) अशाप्रकारे हे यंत्र तयार होईल. हे कामाख्या देवीचे यंत्र आहे. या यांत्रासमोर आपण मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे. कामाख्या देवीच्या मंदिरासमोर देत आहे व्यवस्थित पहा “ओम नमः कामाख्या देवी अमुकं मे वशं करी स्वाहा” इथे अमुकं च्या ऐवजी त्या मुलीचं किंवा तुमच्या पत्नीचे नाव तुम्ही लिहायचं.
तर अशा प्रकारे या यंत्राचा जर आपण वापर केला तर याच्या आकर्षणात आडकलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण सोडवू शकता. हा उपाय स्त्रीसाठी सुध्दा करता येतो किंवा पुरुषासाठी सुद्धा करता येतो. तुमचा मुलगा आहे किंवा पती जर परस्त्रीच्या आकर्षणात अडकला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हाच उपाय करू शकता. अतिशय प्रभावी उपाय आपण नक्की करा माता कामाख्या देवीच्या कृपेने आपलं भलं होवो.