घरात शिवी शाप, अपशब्द, बोलल्याने काय परिणाम होतात? वाचा स्वामींचे उत्तर.

मित्रांनो, वाईट शब्द बोलल्याने काय घडते? यावर स्वामी समर्थांनी दिलेले उत्तर यावर स्वामींचा संदेश काय आहे? हे आज आपण पाहणार आहोत. घरामध्ये शिवी श्राप, अपशब्द बोलल्याने घरामध्ये कोणते परिणाम होतात? याचे उत्तर स्वामींनी खूप छान पद्धतीने दिलेले आहे व ते शंभर टक्के खरे देखील आहे. म्हणूनच आज आपण या लेखातून ते त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपल्या घरात काही असे घडत असते की ज्यामुळे सर्वजण त्रस्त झालेलो असतो. घरात सारखे वाद विवाद होत असतील तर त्यासाठी आपणच जबाबदार असतो. हे आपल्या लक्षात येत नाही.

आपलं घर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी भरलेलं असतं. सर्व सदस्यांनी मिळून आपलं घर हे बनलेलं असतं. घरातील सर्व लोक सर्वांशी गोडीगुलाबीने मिळून-मिसळून एकमेकांना सांभाळून राहत असतात. घरातील सर्व व्यक्तींना घराबाबत सर्व माहिती असते. प्रत्येक व्यक्ती बद्दल ची माहिती प्रत्येक व्यक्ती असते. सर्वांबद्दल प्रेम आपुलकी आपापसात असते. पण घर म्हटलं की, भांड्याला भांड हे लागतेच.

कधी छोट्या गोष्टीवर भांडण, वाद-विवाद तर नंतर त्याचे मोठ्या भांडणात रूपांतर होतं. एकमेकांची मतं एकमेकांना पटत नाही. कधीकधी वाद विकोपाला जातात. एकमेकांना वाईट बोलले जाते. अपशब्द बोलले जातात. कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो आपल्याच व्यक्तींना आपण रागाच्या भरात काहीही बोलून जातो. त्या रागाच्या मागे काही वाईट हेतू नसतो. आपण आपल्या कामात इतके व्यस्त असल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी आपण विटून गेलेलो असतो व आपला हा त्रास हेच दुःख संतापलेला आणि रागाने आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात.

आपण कधी कधी नकळत भयंकर बोलून जातो आणि आपल्याच घरातील व्यक्तींचे अहित व्हावे असे बोलत राहतो. आपण सहज म्हणून जातो. कधीच तुझ चांगलं होणार नाही. कधीच तुला सुख मिळणार नाही. तू असाच राहशील. तू अन्न करशील तुला. खायला मिळणार नाही. तुझे काम कधीच होणार नाही. तू नेहमी दुःखी कष्टी राहशील. पैसा पैसा नको करूस आज पैसा आहे तर उद्या नाही. एक ना अनेक कितीतरी वेळा आपण एकमेकांना अपशब्द बोलत असतो.

शिव्याशाप देतो. परंतु आपल्याला हे माहिती आहे का? आपले घर जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतात आणि दिवसातून एकदा ते तथास्तु म्हणत असतात. जर आपण त्या वेळी घरातील सदस्य या वाईट बोलत असलो आणि त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतात. जर आपण आपले शब्द बोललो तर, त्या सर्व बाबींचे फळ म्हणजे आपण बोललेल्या वाईट शब्दाचे परिणाम असतात. आपल्या समोर सर्व काही येऊ लागतं.

घरातील सदस्य आजारी पडायला लागतात. उत्पन्न कमी होते. आर्थिक समस्या निर्माण होतात. समाजात आपल्याला मान सन्मान कमी होतो. कधी कधी अपत्य होत नाही. मुलं मुलींचे लग्न होत नाही. घरात कूरकूरी राहते. लग्न कार्यात अडथळे येतात. हळूहळू आपली परिस्थिती बिकट होऊ लागते. आपल्याला असं का होते? हे समजतच नाही. आपण हा विचार करत असतो.

आपल्याला वाटत असतं की, आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे. काळी जादू केली आहे. आपले चांगले झालेले सहन झाले नाही. म्हणून असं होत आहे. परंतु आपले वाईट होण्याचे कारण हे आपण समजत असतो ते नसतेच. आपण स्वतः घरामध्ये सतत अपशब्द बोलत असतो आणि त्या प्रमाणे आपला वास्तुपुरुष आपल्याला तथास्तु आशीर्वाद देतो आणि त्यामुळे हे सर्व घडत असते.

आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून रहावे. घरात लक्ष्मी टिकून राहावे. घरातील पैसे येण्याचे मार्ग वाढावेत. घरात भांडण तंटे कटकटी होऊ नयेत. अपशब्द बोलले जाऊ नयेत. असे जर आपल्याला वाटत असेल तर, आपण आपल्या घरामध्ये अपशब्द चुकूनही तोंडातून काढू नयेत. जर आपल्या वास्तुपुरुष आणि आपल्याला आशीर्वाद तथास्तु असा दिला तर आपले सर्व वाईट होते. म्हणून कधीही घरांमध्ये अपशब्द बोलू नये.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *