नमस्कार मित्रांनो, शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच गोंधळला असाल, हो ना? चला तर मग तुमच्या मनातील गोंधळ आता दूर करुयात. तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले व्यक्ती म्हणजे श्रीमंत व्यक्ती, किंवा श्रीमंत घरात जन्माला येण्याचा भाग्य घेऊन जन्माला आलेली व्यक्ती, हा एवढाच त्याचा अर्थ नाही तर काही लोक ही मिडास राजा सारखी असतात.
मिडास राजा म्हणजे ज्या गोष्टीला हात लावतील त्या गोष्टीचे सोने करणारा, अर्थात त्यांना संधीचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा याची उत्तम कला अवगत असते. असे प्रयत्नवादी, मेहनती, आणि यशस्वी होणारी लोक ही नेमक्या कोणत्या राशीची असतात हे जोतिष शास्त्राचा आधार घेऊन आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूयात.
तर यामधे सगळ्यात पहिली रास असते ती म्हणजे वृषभ रास. ह्या राशीची लोक ही कोणाच्याही अध्यात मध्यात नसतात. अलिप्त राहून ते नेहमीच स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करत असतात. या राशीचे लोक आपल्या आयुष्यात त्यांना जे काही हवे असते ते पूर्णपणे मेहनतीच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तरुणपणी भरपूर मेहनत करून त्यांचे निवृत्तीचे आयुष्य अगदी सुखात , वैभवात आणि आनंदात जगतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना जरीही जन्मतःच सोन्याचा चमचा मिळाला नाही तरीही त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कष्टांची फळे नक्कीच चाखायला मिळतात.
दुसरी रास आहे कर्क. कर्क राशीची लोक खूपच मेहनती असतात. अतिशय कमी वयातच ते अर्थार्जनाला सुरुवात करतात. ते त्यांच्या कामात यशस्वी देखील होतात. पैशांच्या बाबतीत ते नशीबवान असतातच, त्यांच्याकडे पैश्यांची कमतरता कधीच जाणवत नसते, परंतु कधी पैश्यांची कमतरता निर्माण झालीच तरी देखील त्यावर ते योग्य प्रकारे मत करतात. तसेच त्यांना वारसा हक्काने सुद्धा संपत्ती मिळण्याची शक्यता असते.
तिसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीचे लोक हे प्रयत्न वादी असतात. ते कधीच एका व्यवसायावर अवलंबून राहत नाहीत. अनेक उद्योगांतून या राशीचे लोक पैसे कमावतात. तसेच त्यांच्यात नेतृत्वाचे चांगले गुण असतात, आणि म्हणूनच त्यांना मान सन्मान देखील भरपूर प्रमाणात मिळतो. जरी त्यांना स्वतःची संपत्ती गोळा करता आली नाही तरीही त्यांना दुसऱ्याच्या संपत्तीतून चैनिचे आयुष्य उपभोगायला मिळते.
चौथी आणि शेवटची रास आहे वृश्चिक रास. या राशीच्या लोकांना अगदी लहानपनासूनच चैनिचे आयुष्य जगण्याची ओढ असते. आणि त्यासाठी हे लोक वाट्टेल तेवढी मेहनत घेतात आणि स्वप्नातले आयुष्य प्रत्यक्षात जगतात. हे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सुखाची फार काळजी घेतात आणि आपल्याप्रमाणेच त्यांना सुद्धा सुबत्ता पूर्ण आयुष्य उपभोगण्याची संधी देतात. परंतु यांच्या प्रगतीच्या मार्गात आलेल्या अडथळ्यांना हे साम, दाम, दंड,भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर करून दूर करतात.
मित्रांनो, आता तुमच्यापैकी बरेचजण असे असतील, ज्यांची रास या चार राशींपैकी एक असेल परंतु आर्थिक परिस्थिती चांगली असेलच असे नाही. परंतु याचे कारण हे सुद्धा असू शकते की कदाचित त्यांना आजपर्यंत चांगली संधीच मिळाली नसेल, पण जेव्हा केव्हा त्यांना चांगली संधी मिळेल तेव्हा त्या संधीच सोन या चार राशी नक्कीच करतील. मंडळी मग तुमची रास काय आहे? आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? नक्कीच तो थोडाफार वेगळा असूच शकतो, पण तो आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!