नकळतपणे ही 5 पापे करणारे जीवनभर दरिद्रीच राहतात, कोणती आहेत ती पापे जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मामध्ये एकूण 18 पुराण आहेत. त्यामध्ये शिवपुराण हे एक असे पुराण आहे ज्यामध्ये मनुष्य जीवन सुखमय होण्यासाठी अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. शिवपुराणात माता पार्वती व भगवान शिव यांच्या संवादाचे सार सांगितले गेले आहे.

शिवपुराणामध्ये अशा 5 पापांचे वर्णन केले गेले आहे व जो मनुष्य नकळत किंवा चुकून ही पापे करतो त्याला त्याचा दंड भोगावा लागतो. भगवान शिवांच्या अनुसार कलियुगातील माणूस चुकून अशी पापे करतात. पण ज्या व्यक्ति अशी पापे करत नाहीत, ते जीवनात सुखी राहतात, अशी व्यक्ति निरोगी राहते. शिवपुराणा नुसार मनुष्याने अशी पापे चुकूनही करू नयेत.

भगवान शिवाची तुमच्यावर कृपा होत नाही. कलियुगात धर्म फक्त 1/4 भाग उरला आहे. म्हणून मनुष्य पाप करतो. पण तुम्ही देवावर विश्वास ठेवून जर धर्माच्या मार्गावर चालत राहिलात, तर निराकार ईश्वराला तुम्ही लवकर प्रसन्न करू शकता. त्यासाठी तुम्हाला पापरहित मनुष्य बनावे लागेल.

जर तुम्ही यावर लक्ष दिले तर चुकूनही तुमच्या हातून पाप घडणार नाही व ईश्वराची सहज तुमच्यावर कृपा होऊ शकते. पण तरी तुम्हाला त्याचे उचित फळ प्राप्त होत नाही कारण नकळत तुमच्या हातून काही पापे होतात, जे तुमच्या पुण्यकर्माचे संतुलन बिघडवतात. म्हणून तुम्हाला या पापांबद्दल माहिती असणे जरूरी आहे.

आज आम्ही तुम्हाला त्या 5 पापांबद्दल सांगणार आहोत जी भगवान शिव यांनी पार्वती मातेला सांगितली होती. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती पापे.

वाचेद्वारे (बोलण्यातून) झालेले पाप – शिवपुराणानुसार तोंडाने कोणाला वाईट बोलणे किंवा कोणाला दू:ख देण्यासाठी वाईट भाषा वापरणे हे खूप मोठे पाप आहे. त्याला “वांछित पाप” असे म्हणतात. मनुष्याने नेहमी सत्य व मधाळ, गोड बोलले पाहिजे. जे लोक आपल्या तोंडाने खोटे बोलतात किंवा कटू शब्दात कोणाचा अपमान करतात, त्याला पाप मानले जाते. असे लोक जीवनात गरीब राहातात.

चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात राहाणे- भगवान शिवांच्या नुसार चोरी करणे, हत्या करणे पाप आहे. त्याचबरोबर अशा लोकांच्या संपर्कात येणे, त्यांना मदत करणे हे मोठे पाप आहे.

शारीरिक पाप – शिवपुराणात प्रकृतीला ईश्वर मानले गेले आहे. अत: प्रकृतीचे नुकसान करणे हे पाप मानले जाते. झाडे, रोपे कापणे, पशुचि हत्या करणे हे शारीरिक पाप आहे. त्याशिवाय पायाखाली छोटे छोटे जीवजंतूंची हत्या करणे, हे पाप मानले गेले आहे.

मानसिक पाप- शिवपुराणानुसार, कलियुगी मनुष्य रोज मानसिक पाप करतो. मानसिक पाप ते असते जे माणसाच्या जीवनात वाईट विचार निर्माण करते, जे कोणत्याही स्त्रीबद्दल असो, किंवा दुसर्‍या व्यक्तीची उन्नती बघून होते, किंवा कोणाचे सौंदर्य बघून झाले असुदे, मनात त्याच्या प्रती वाईट विचार आणणे हे पाप आहे.

तसेच, ईश्वराला प्रार्थना करणे, कोणाचे तरी वाईट होण्यासाठी तर ते पाप आहे. कोणत्याही मनुष्याच्या मनात देवाचा निवास असतो. तुम्ही जर मनात वाईट विचार आणले, तर तो त्या देवाचा अपमान मानला जातो.

निंदा करणे – शिवपुराणानुसार कलियुगातील सगळ्यात मोठे पाप आहे निंदा करणे. मनुष्याने कधीही कोणाचीही निंदा करू नये. वडीलधार्‍यांची निंदा करणे मोठे पाप आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *