ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुलचाही फुलण्याचा जन्म सफल होतो.
फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो. ‘ज्याचे होते त्याला दिले’ फक्त हा भाव म’नात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग नि’रिच्छ म’नाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो. त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.
अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे. त्यांच्याप्रती कोणतीही भा’वना बांधून ठेवायची नाही. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती. ती आता ‘त्याची’ झाली.
त्यांचा कसला विचार करायचा. त्याचे- रामाचे स्मरण करावे. नामसाधना करावी. आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मो’ह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.
शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.
आज पेरण्यासाठी आपण आनंदाने, धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात. तशी मनाची साफ- सफाई करु. नामस्मरण करू आणि तिथे आनंद पेरुया. तो शतपटीने उगवून येतो. त्याची जोपासना करु. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच,
“दु:ख सोडून दयावे, निर्माल्य बनून जाते. नामसाधना करावी, आनंद पेरत जावा, समाधान बनून रहाते. श्री स्वामी समर्थ.”
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!