माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. या वर्षी रथसप्तमी ही 7 फेब्रुवारी सोमवारी झालेली आहे. या दिवशी भगवान सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी सूर्य देवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
तसेच या रथसप्तमीला आचल सप्तमी, पुत्र सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं. सूर्य या ग्रहांचा सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडत असतो. सूर्य हा करिअर, सुख-समृद्धी आणि प्रगती यांचा कारक मानले गेले आहेत. त्यामुळे जी व्यक्ती सूर्य देवाची उपासना करते, सूर्य देवाचे पूजन करते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धना, पैसा, सुख-समृद्धी आणि आरोग्य यामध्ये वृद्धी होते.
दररोज सूर्य देवाची उपासना करणे शक्य नसेल, तर लोकांनी कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी सूर्य देवाचे पूजन नक्की कराव आणि शक्य नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा करावी. यामुळे सुद्धा आपले जीवन निरोगी राहते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा सूर्यदेव पूर्ण करतात.
एखादी व्यक्ती आजारी असेल, तर ती रोगमुक्त होते. त्याच्या कारकीर्दीतील अडचणी दूर होतात आणि त्या व्यक्तीची प्रगती होऊ लागते. या दिवशी केली स्नान, होम आणि दान, पूजा इत्यादी गोष्टी हजारो पटीने जास्त फळ प्रदान करतात.
याचबरोबर समाजामध्ये सुद्धा आपल्याला मान-सन्मान प्राप्त होतो. कुंडलीतील सूर्य ग्रह मजबुत असेल, तर त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यमध्ये यश मिळते.
ती व्यक्ती जे काम हाती घेईल ते काम निर्विघ्नपणे पार पडतं कार्यमध्ये त्याने यश मिळतं. तुमच्या घरात जर आजार पण असेल, अनेक प्रयत्न करूनही घरातील आजारपण जात नसेल किंवा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक उर्जा असेल किंवा तुम्हाला समाजात मान-सन्मान नसेल किंवा प्रतिष्ठान असेल यासाठी या रथसप्तमीला छोटासा उपाय नक्कीच करावा. आपल्या कुंडलीतील सूर्यग्रहण मजबूत करण्यासाठी त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी आपल्याला कोणते विशेष उपाय करायचा आहे.
सूर्य दैवत हे सतत रथात विराजमान असतात, जसे देव देवळांत असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाना महत्त्व प्राप्त होतं अगदी तसंच महत्त्व सूर्य देवांच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेने बरोबरच प्रतिकात्मक रथाचे पूजन केलं जातं. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं.
तांब्यामध्ये आपल्याला जल घ्यायचे आहे, या जलामध्ये थोडंसं कुंकू आणि थोडेसे अक्षद आणि एक लाल रंगाचे फूल टाकायचा आहे. आता या पाण्याने सूर्यनारायणाला मनोभावे करायचा आहे, त्यांना अर्घ्य द्यायचा आहे आणि या वेळी सूर्य देवाची 12 नावे आपल्याला बोलायचे आहे.
ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुशने नमः, ओम हिरण्यागर्भाये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम आर्काय नमः, ओम भास्कराये नमः, ओम श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः. मग यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे, ती सूर्यनारायण समोर बोलून दाखवायचे आहे.
मग त्यांनतर आपल्या घराबाहेर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढायचे आहे आणि त्याची मनोभावे पूजा करायचे आहे. गंध अक्षद आणि विशेष करून फुले अर्पण करायचे आहेत.
मग सुर्याची प्रार्थना करून “आदित्य स्तोत्र सूर्य” आणि सूर्य कवचाच पठण करू शकता. जर हे शक्य नसेल तर फक्त ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करा. मग त्यानंतर पूजन झाल्यावर आंगणामध्येच गोवऱ्या पेटवून
त्यावर एका भांड्यात दुध उतू जाईपर्यंत तापवायचे आहेत. म्हणजेच हे दूध अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवायचे आहे, मग उर्वरित दुधाचा हा प्रसाद सर्वांना वाटायचे आहे. जी व्यक्ती सूर्यदेवाचे मनोभावे उपासना करते, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकटांचा नाश होतो. त्या व्यक्तीला बळ, बुद्धी, सुख-संपदा धना-ऐश्वर्याची प्राप्त होते. ती व्यक्ती निरोगी व आजारपण सुद्धा नाहीसं होतं आणि समाजात सुद्धा त्या व्यक्तीची पद-प्रतिष्ठा वाढतच जातो. तर तुम्ही सुद्धा या रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा नक्की करा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!