महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळात सत्यनारायण पूजा करावी. जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात, व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णुंवर अाहे अाणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणुन मेल्यानंतर मृत अात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो, अापल्या घरात पुरेसे न मिळणे, अार्थीक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात अाला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे.
सतत १२ पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना अालेले दिसतात याचे कारण असे की, अापण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही.
कारण विकतचे अाणलेले धान्य अापल्या घरी अाल्यानंतर अापण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात. ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये, जैसे खावे अन्न वैसे उपजे मन’ या सर्व गोष्टी अापल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करु शकतात. घरातील माणसे एकविचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ अापल्याला या ठिकाणी दिसुन येते. म्हणुन अापल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली अाहे.
अापल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने, भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर अापण पुजन केले तर त्या पैशाचे अाणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात. तसेच तो पैसा धन, पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख, शांती, अानंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते.
सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि.) करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी.
पूजेचे साहित्य – १ पाट, १ चौरंग, चौरंगाभोवती अांब्याचे चार डहाळे, चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड, ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपार्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात (पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी.
नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य, दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. अारती करुन प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुध्दा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात.
कारण जेंव्हा धान्य दुकानातून विकत अाणत असतो, त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा, संक्रातीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, अार्थीक स्थिती सुधारते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.