श्री स्वामी समर्थ, मित्रांनो.. मंत्र जप काय आहे, त्याचे महत्व, त्याचे पालन कसे करावे याची माहिती स्वामी भक्तांना असायलाच पाहिजे. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र नावातच त्याचा अर्थ दडला आहे. असा मंत्र जो आपल्याला तारुण नेतो. आपलं सं’रक्षण करतो. जो संकटात आहे, त्रा’साने ग्रा’सलेला आहे, स्वामी त्याची द’या करतात, या मं त्राचा जप तुमची मा नसि कता बदलतो, तुम्हाला सं कटाशी दोन हात करण्यासाठी बळ देतो.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात इ.स. १८५६ मध्ये ते प्रगट झाले, तो आजचाच दिवस. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला.’ खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देत आहेत.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो आपापल्या वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप आपल्या संपूर्ण कुटुंबासहित नक्की करा. श्री स्वामी समर्थाचा फोटो, मूर्ती ही आपण समोर ठेवावी, पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा. जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती प्रज्वलित करावी, दिवा लावावा सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावं आणि त्यानंतर फक्त एकवेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा.
ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला ‘तारक मंत्र’ तणाव नियंत्रणाचे धडे देतो. तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दि’लासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव खुप दूर पळून जाईल. यासाठी तारक मंत्राची आशयासह उजळणी करू.
नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी
कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही. सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भयी असले पाहिजे. भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची? कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचे हे स्वामी बघून घेतील.
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ ना नेई त्यालापरलोकीही ना भिती तयाला
स्वामी कथेतला एक प्रसंग. यमराज एका व्यक्तीला न्यायला आले. ती व्यक्ती स्वामीभक्त होती. तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रगट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावले. एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपला काळ कधी यायचा, हे स्वामी ठरवतील. आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल.
उगाची भितोसी भय हे पळु दे.जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही. म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्म मृत्यू खेळ आहे. या प्रवासात जेवढे आयुष्य वाट्याला आले, मनसोक्त जगून घ्यायचे. आई बाळाला सांभाळते, तशी आपली काळजी घ्यायला स्वामी ‘समर्थ’ आहेत.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात,नको डगमगु स्वामी देतील साथ
माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही. तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले, तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत, हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायला हवा. ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे.
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वामीच ह्या पंचप्राणामृतात,हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती
स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपले विहितकर्म पूर्ण करा. कारण काम हाच ईश्वर आहे. काम सोडून, जबाबदारी झटकून स्वामीभक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येत तणावमुक्त करतात.
मित्रांनो जर दररोज नित्त नियमाने आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला. तर घरामध्ये अदभूत बदल झालाच तुम्हाला नक्की दिसून येईल. मित्रांनो श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की घरामध्ये अदभूत ताकद आहे आणि या मंत्राचा जप जेव्हा अशाप्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो. तेव्हा या मंत्राची ताकत त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म बाहेर पडत ते भस्म हे प्रभाळीत होऊन जातं आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा मित्रांनो प्रचंड स्वामी बळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!