मित्रांनो, जेव्हा आपण झोपतो तेंव्हा आपलं शरीर तर शांत होत. मात्र आपला मेंदू, आणि अंतर्मन सतत कार्यरत राहात. ते जागृत असत आणि या पाच वस्तूचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव आपल्या अंतर्मनावर आणि मेंदूवर नकळत पडत असतो आणि म्हणूनच वास्तू शस्त्राने या पाच वस्तूना जवळ ठेवून झोपण्यास मनाई केलेली आहे.
आज आपण वास्तू शास्त्रातील एक अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत. रात्री झोपताना या पाच वस्तू चुकूनही आपल्या जवळ ठेऊ नयेत. जी व्यक्ती या पाच वस्तू आपल्या जवळ ठेऊन झोपते किंवा त्या व्यक्तीजवळ या पाच वस्तू असतात. त्या व्यक्तीचं भाग्य दुर्भाग्यात बदलत. अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी राहणं कधीच पसंत करत नाही आणि हळू हळू त्या घरात गरिबी, दारिद्र्ता, आणि कंगाली आपल वास्तव्य करू लागतात. थोडक्यात असं घर हळू हळू बरबादीच्या दिशेने निघत. चला तर मग जाणून घेऊया, या पाच वस्तू कोणत्या?
मित्रांनो यातील पहिली वस्तू आहे घड्याळ किंवा कॅलेंडर अशा वस्तू की ज्या वेळ दर्शवतात. अशा वस्तू सुध्दा झोपताना आपल्या जवळ नसाव्यात.जर या वस्तू वारंवार आपल्या जवळ असतील, तर आपली वेळ लवकरच वाईट वेळेमध्ये परिवर्तित होते. आणि हळूहळू आपली चांगली वेळ संपून जाते आणि वाईट वेळ आपल्या जीवनात येते, जे काही चांगलं चालू आहे ते सर्व चांगलं चालू असलेलं बिघडत आणि मनुष्याला दुर्भाग्याचा सामना करावा लागतो.
दुसरी वस्तू आहे पर्स किंवा पॉकेट म्हणजेच जी व्यक्ती झोपताना आपल्या जवळ पॉकेट ठेवून झोपते किंवा पैसे किशात ठेवते. हा माता लक्ष्मीचा खूप मोठा अनादर आणि अपमान मानला जातो. अशा घरात लक्ष्मी राहणं पसंत करत नाही आणि वारंवार ही चूक घडली तर लक्ष्मी असं घर सोडून निघून जाते आणि जेव्हा लक्ष्मी जाते. तेव्हा तिची जागा अर्थातच अलक्ष्मी घेते. अलक्ष्मी म्हणजे गरिबी, दारिद्रता आणि कंगाली.
मित्रांनो त्यानंतरची तिसरी वस्तू आहे पुस्तकं, कोणतीही पुस्तके त्यातून आपल्याला विद्या मिळते, ज्ञान मिळतं, अशी पुस्तके जर झोपताना आपल्या जवळ असतील.तर कदाचित चुकून आपला पाय त्याला लागण्याची शक्यता असते. या पुस्तकांचा त्यामुळे अनादर होतो.
पुस्तके म्हणजे प्रत्यक्ष माता सरस्वतीचे रूप असतात. आणि सरस्वतीचा अपमान ज्याठिकाणी होतो, त्या ठिकाणी लक्ष्मी सुध्दा राहन पसंत करत नाही. आणि म्हणूनच कोणत्याही स्वरूपाची पुस्तके, आणि विशेष करून धार्मिक पुस्तके ही चुकूनही झोपताना आपण आपल्या जवळ ठेऊ नयेत.
चौथी वस्तू आहे विद्युत उपकरणे मोबाईल, लॅपटॉप किंवा कंप्युटर असेल, झोपण्याच्या खोलीत किंवा आपल्या डोक्याच्या जवळ किंवा शरीराच्या जवळ या वस्तू असल्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव आपल्या संपूर्णपणे शरीरावर पडतो. यातून निघणारी जी विद्युत किरणे असतात, विद्युत चुंबकीय लहरी असतात.
पाचवी गोष्ट आहे, चप्पल किंवा बूट, अनेक लोक बूट पायात घालूनच झोपतात. खूप चुकीची सवय आहे. बूट, चप्पल, किंवा पायमोजे असतील, या वस्तू, पायमोजे धुतलेले असतील तर काही हरकत नाही. जर थंडीचे दिवस आहेत. मात्र जे सॉक्स किंवा बूट, ज्या चप्पला आपण दिवसभर वापरलेल्या आहेत आणि या चप्पल बुटांना नकारात्मक शक्ती चिकटलेल्या असतात,
नकारात्मक शक्ती या गोष्टींन सोबत आपल्या घरात येत असतात म्हणूनच हे बूट ह्या चप्पल आपण घराबाहेरच सोडाव्यात. या झोपण्याच्या जागी चुकूनही ठेऊ नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो आणि झोप अपूर्ण राहते. विशेष करून अमावस्या तिथीला ही चूक आपण करू नका.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!